PM Kisan Mandhan Yojana Saam Tv
ऍग्रो वन

Modi Govt Schemes: मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 36 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे योजना

PM Kisan Mandhan Yojana: देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकाराच्या वतीने अनेक योजना राबवण्यात येतात.

Satish Kengar

PM Kisan Mandhan Yojana:

देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकाराच्या वतीने अनेक योजना राबवण्यात येतात. अनेक शेतकरी एका विशिष्ट वयापर्यंत शेती किंवा मजूर करून आपला उदरनिर्वाह करतात. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर, त्यांच्या जीवनात आर्थिक स्तरावर अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो.

शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकार एक योजना राबवत आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे. विशेषतः शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण करू शकतो अर्ज?

या योजनेसाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी भारत सरकारच्या पंतप्रधान किसान मानधन योजनेत अर्ज करू शकतात आणि गुंतवणूक सुरू करू शकतात. तुम्ही या योजनेसाठी ज्या वयात अर्ज करता, त्या वयाच्या आधारे गुंतवणुकीची रक्कम ठरवली जाते. गुंतवणुकीची रक्कम 55 ते 200 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

जर शेतकऱ्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला. अशातच त्यांना या योजनेत दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तसेच जेव्हा गुंतवणूक करणारा शेतकरी 60 वर्षांचा होईल, त्यानंतर त्याला दरमहा 3,000 रुपये (वार्षिक 36,000 रुपये) पेन्शन मिळेल.

या योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीला दरमहा 50 टक्के पेन्शन मिळते. शेतकरी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला दरमहा 1500 रुपये पेन्शन मिळेल. यातच तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो. भारत सरकारच्या या योजनेत देशभरातील अनेक शेतकरी अर्ज करत आहेत आणि गुंतवणूक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसने केली मोठी कारवाई

Kharik Khobra Laddu: हिवाळ्यात बनवा खारीक-खोबऱ्याचे पौष्टिक लाडू, महिनाभर टिकतील

Colon cancer: हे 6 संकेत दिसले तर समजा आतड्यांचा कॅन्सर झालाय

Sunny Deol: लाजा वाटत नाहीत का? घरापर्यंत आलेल्या पॅप्सला सनी देओलने घातल्या शिव्या

Delhi Blast: ८ दहशतवादी, ४ शहरं आणि ४ कार... फक्त दिल्लीच नव्हे तर देशाला हादरवण्याचा होता प्लान; तपासातून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT