Crop Insurance
Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance: पीकविम्‍यापासून शेतकरी वंचित; मनसेचे प्रतीकात्मक फाशी आंदोलन

दीपक क्षीरसागर

लातूर : चालू वर्षी लातूर जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या अनेक संकटांचा मारा शेतकऱ्यावर झाला. यातून औसा तालुक्यातील अनेक गावांना (Crop Insurance) पिक विम्यातून वगळले आहे. या विरोधात आज औसा तहसील कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS) प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. (Latur News Crop Insurance)

लातूर (Latur) जिल्ह्यात मुख्यतः सहा लाख हेक्टर या पेरणी क्षेत्रापैकी जवळपास चार लाख 80 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली. दरम्यान गोगलगाय, अतिवृष्टी, मोजक अशा रोगांचा सोयाबीन (Soybean) पिकावर मोठा हल्ला झाला. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) संपूर्ण अर्थकारण असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पिक विम्‍यापासून वंचित

चालू वर्षी राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदान तर विमा कंपन्यांनी ठराविक भागातच पिक विमा जाहीर केला. यामुळे खरं पाहता जिल्ह्यात सर्वत्र गोगलगाय, अतिवृष्टी आणि बुरशीजन्य रोगांचा धोका असतानाही शेतकरी विमापासून वंचित राहिल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली औसा तहसील कार्यालयात प्रतिकात्मक फाशी घेण्याचा आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी मोठ्या संख्येने मनसे सैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

SCROLL FOR NEXT