अक्षय शिंदे
जालना : अद्रक काढणीला सुरवात झाली असल्याने उत्पादक शेतकरी अद्रक विक्रीसाठी मार्केटमधे आणत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून अद्रकच्या दरात मोठी घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे लागवडीसह उपदासासाठी लावलेल्या खर्च देखील निघणे कठीण झाले आहे. परिणामी अद्रक उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
जालन्यातील जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील अनेक शेतकरी अद्रकची शेती करतात. मागील वर्षी अद्रकला चांगला दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदा महागडे बियाणे आणत अद्रकची लागवड केली होती. आता काढणीला सुरवात झाली असून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली आहे. आवक सुरु झाल्यानंतर दरात घसरण होण्यास सुरवात झाली आहे.
प्रति क्विंटल दोन हजार रुपये भाव
यावर्षी बाजारपेठेमध्ये अद्रकला दोन हजार रुपये भाव मिळत असल्याने अद्रक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अद्रकच्या लागवडीचा खर्चही उत्पादनातून निघत नसल्याने अद्रक उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान अद्रकला हमीभाव देण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.
वाशिममध्ये पपईच्या दरात वाढ
वाशीम : काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यात पपईचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. पपईचा दर ५ ते ६ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला होता. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. मात्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील हवामानातील बदलांमुळे वाशिममधील पपईसाठी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. याचा थेट परिणाम पपईच्या दरांवर झाला असून, सध्या पपई ९ ते १० रुपये प्रति किलोच्या दराने विकली जात आहे. मागणीतील वाढ आणि चांगला दर मिळत असल्याने पपई उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.