Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडीची चिंता; विवंचनेतून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र उत्पन्न चांगले न आल्याने कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत ते होते

Rajesh Sonwane

जळगाव : डोक्यावर कर्जाचा बोजा असल्याने तो फेडायचा कसा याची चिंता लागून होती. याच विचारातून कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे घडली आहे. बद्रीसिंग पुना चव्हाण (वय ५८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

बद्रीसिंग चव्हाण हे शेतीकाम करून परिवाराचा (Jalgaon) उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र उत्पन्न चांगले न आल्याने कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत ते होते. याच तणावात ते राहत असल्याचे चव्हाण यांच्या नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान १६ जुलैला सकाळी त्यांची पत्नी, दोन्ही मुले आणि सुना शेतात गेले होते. यावेळी त्यांचे नातू आणि बद्रीसिंग चव्हाण घरीच होते. घरात कोणी नसताना सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. 

बाहेर खेळायला गेलेला बद्रीनाथ यांचा नातू पाणी पिण्यासाठी घरात आला, तेव्हा ही घटना उघडकीला आली. नातूने कुटुंबातील इतरांना माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांनी घरी धाव घेत बद्रीनाथ चव्हाण याना (Jalgaon Medical collage) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT