jalna, cauliflower, farmer
jalna, cauliflower, farmer saam tv
ऍग्रो वन

Angry Farmer : शेतमालास भाव नाही, संतप्त शेतकऱ्याने उभ्या पिकात साेडली जनावरं (पाहा व्हिडीओ)

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : सध्या कोणत्याही भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी (farmer) कमालीचा हैराण झाला आहे. उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने जालन्यातील (jalna) सोमठाणा गावातील लक्ष्मण तायडे या शेतकऱ्याने आपल्या उभ्या गोबीच्या पिकात जनावर सोडली. (Maharashtra News)

सध्या बाजारपेठेत कांदा, वांगी, टोमॅटो, मेथी, कोबी या भाजीपाल्याची आवक जास्त आहे. त्यामुळे या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात दर घसरले आहेत. सोमठाणा येथील शेतकरी लक्ष्मण तायडे यांनी एक एकर शेतावर गोबीची लागवड केली.

त्यांनी 35 कट्टे गोबी मजूर लावून ती तोडली. हा गाेबी जालन्यातील बाजार समितीत विक्रीसाठी आणला. त्यांना प्रति कट्टा 40 रुपरये दर मिळाला. त्यासाठी मजुरी 400 रुपये, वाहतूक खर्च 700 रुपये आला. 22 कट्ट्यातील 396 किलो गोबीचे त्यांच्या हाती 720 रुपये पडले.

त्यांना 380 रुपये खिशातून टाकावे लागलेत. त्यामुळे किलोला त्यांना केवळ 3.50 पैसे दर मिळल्याने आणि लागवड आणि औषधींचा खर्च पाहता 20 हजाराचा खर्च झाल्याने शेतकरी लक्ष्मण तायडे यांनी संतप्त हाेऊन उभ्या गोबीच्या पिकात जनावर चरण्यासाठी सोडून दिले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : निलेश लंके, सुजय विखे पाटील यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT