jalna, cauliflower, farmer saam tv
ऍग्रो वन

Angry Farmer : शेतमालास भाव नाही, संतप्त शेतकऱ्याने उभ्या पिकात साेडली जनावरं (पाहा व्हिडीओ)

जालन्यातील बाजार समितीत गाेबी विक्रीसाठी आणला हाेता.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : सध्या कोणत्याही भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी (farmer) कमालीचा हैराण झाला आहे. उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने जालन्यातील (jalna) सोमठाणा गावातील लक्ष्मण तायडे या शेतकऱ्याने आपल्या उभ्या गोबीच्या पिकात जनावर सोडली. (Maharashtra News)

सध्या बाजारपेठेत कांदा, वांगी, टोमॅटो, मेथी, कोबी या भाजीपाल्याची आवक जास्त आहे. त्यामुळे या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात दर घसरले आहेत. सोमठाणा येथील शेतकरी लक्ष्मण तायडे यांनी एक एकर शेतावर गोबीची लागवड केली.

त्यांनी 35 कट्टे गोबी मजूर लावून ती तोडली. हा गाेबी जालन्यातील बाजार समितीत विक्रीसाठी आणला. त्यांना प्रति कट्टा 40 रुपरये दर मिळाला. त्यासाठी मजुरी 400 रुपये, वाहतूक खर्च 700 रुपये आला. 22 कट्ट्यातील 396 किलो गोबीचे त्यांच्या हाती 720 रुपये पडले.

त्यांना 380 रुपये खिशातून टाकावे लागलेत. त्यामुळे किलोला त्यांना केवळ 3.50 पैसे दर मिळल्याने आणि लागवड आणि औषधींचा खर्च पाहता 20 हजाराचा खर्च झाल्याने शेतकरी लक्ष्मण तायडे यांनी संतप्त हाेऊन उभ्या गोबीच्या पिकात जनावर चरण्यासाठी सोडून दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कराडजवळील उंब्रज येथील गणेश धाब्याजवळ माल वाहतूक ट्रक पेटला

अभिनेत्री ऊर्फी जावेदने मुस्लिम धर्म सोडला? आता कोणता धर्माचं पालन करतेय? VIDEO

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला, भाजपच्या मंत्र्याची राजधानीत घोषणा

Maharashtra Politics: विलिनीकरणावरून वाद पेटला; अजित पवार गटाच्या आमदाराचा शरद पवार गटावर हल्लाबोल

मोठी बातमी! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT