Soyabean Price Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण; १० दिवसात ७०० रुपयांनी दर घसरले

Dharashiv News : सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने अनेकांनी सोयाबीनचा साठा करुन ठेवला आहे. मात्र दर घसरल्याने शेतकऱ्यांची सातत्याने निराशा होत आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : सोयाबीनचे दर यंदा हवे तसे मिळाले नाहीत. परंतु दर वाढतील या अपेक्षेत शेतकरी (Farmer) होता. मात्र दर न वाढता त्यात घसरण होत असल्याचेच पाहण्यास मिळत आहे. यात धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यात सोयाबीनचे दर मागील दहा दिवसात ७०० रुपयांनी घसरल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. (Latest Marathi News)

सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने अनेकांनी सोयाबीनचा साठा करुन ठेवला आहे. मात्र दर घसरल्याने शेतकऱ्यांची सातत्याने निराशा होत आहे. यंदाच्या वर्षात सोयाबीनला जास्तीत जास्त ५  हजार ४०० पर्यंतचा दर (Soyabean Price) मिळाला. त्यानंतर सातत्याने दरामध्ये घसरण होत आहे. ऐकीकडे सोयाबीन उत्पादनासाठी लागणारा खर्च वाढत असताना दर कमी होत असल्याने शेतकरी वर्गातुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामाचे पेरणीचे क्षेत्र सुमारे ५ लाख हेक्टपर्यंत आहे. यापैकी सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा आहे. मात्र सातत्याने दरात घसरण होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आता सोयाबीनचा साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांना कमी दारात विक्री करावी लागणार असल्याने आर्थिक झळ देखील शेतकऱ्यांना सोसावी लावणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT