Dharashiv News Saam tv
ऍग्रो वन

Dharashiv News : केवायसी करूनही दुष्काळी अनुदानापासून वंचित; धाराशिव जिल्ह्यातील ४१ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Dharashiv News : केवायसी केलेली असतानाही त्यांना दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात एकीकडे तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यांना खरीपाची पेरणी करण्यासाठी पैसा नाही, तर दुसरीकडे दुष्काळ असलेल्या धाराशिव, लोहारा व वाशी तालुक्यातील ४१ हजार ६९८ शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळण्याची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे. 

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यासाठी शासनाने दुष्काळी अनुदान देण्याचे जाहीर केले होते. याकरिता केवायसी करणे अनिवार्य होते. दरम्यान केवायसी केलेली असतानाही त्यांना दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ३१ ऑक्टोबरला शासनाने ४० तालुक्यांमध्ये गंभीर, मध्यम स्वरूपाचा (Drought) दुष्काळ जाहीर करून विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या होत्या. 

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा, वाशी व धाराशिव या तीन तालुक्याचा समावेश आहे. यामध्ये १ लाख ५४ हजार २५९ शेतकऱ्यांना (Farmer) २०८ कोटी ५० लाख अनुदान मंजुर झाले होते. यातील ४१ हजार शेतकरी निधी नसल्याने केवायसी करुन ही दुष्काळी अनुदानापासुन वंचित आहेत. त्यामुळे हे अनुदान तातडीने द्यावे; अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोट सुटलंय? जाडे दिसताय? मग आजपासूनच घरच्या घरी सुरू करा 'हे' 5 योगा

मी धर्म संकटात, पाऊल चुकीचे वाटतंय, पण...; ओमराजे निंबाळकरांनी स्पष्टच सांगितलं

Operation Tiger : ठाकरेंचे 'ते' २ खासदार फुटायला तयारच नव्हते; दिग्गज नेत्यानं खेळला मास्टरस्ट्रोक अन् स्क्रिप्ट बदलली

Operation Tiger : २१ जूनला राजकीय भूकंपाची पुनरावृत्ती; उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेसेनेत प्रवेश करणार?

Maharashtra News Live Update: संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याने काही फरक पडत नाही - भरत गोगावले

SCROLL FOR NEXT