संजय जाधव
बुलढाणा : बुलढाणा Buldhana जिल्ह्यात सुरुवातीला थोडाफ़ार पाऊस Rain झाला. त्या पावसाच्या भरावश्यावर शेतकऱ्यांनी जिल्ह्यात 66 टक्के पेरण्या केल्या. मात्र 25 दिवसांपासुन जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे. तसेच पाऊस नसल्याने 'वाणु' या किडिने पिकावर भड़ीमार केला आहे. Crisis of double sowing on farmers due to pest infestation
हे देखील पहा-
त्यामुळे शेतातील पिके सुकायला लागली आहेत. तसेच पाऊस नसल्याने वाणु या किडिने पिकावर भड़ीमार केला आहे. त्यामुळे थोडेफार उगवलेले पिक सुद्धा नष्ट होताना दिसत आहे. त्यांमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट आले आहे. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे.
राज्याच्या कृषी मंत्रालयाने Agriculture Department जिल्ह्यातिल कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तसेच पाऊस येत नसल्याने आता दुबार पेरणी करण्याच्या उंबरठयावर पोहचला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या समस्याकड़े लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.