Beed Newz
Beed Newz Saam tv
ऍग्रो वन

अतिवृष्टीने शेतकरी हतबल; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी हतबल झाला आहे. यामुळे इथला शेतकरी नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. आज एकाच दिवशी जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांनी (Farmer) आत्महत्या केल्या आहेत. तर मागील पाच दिवसात पाच आत्‍महत्‍या झाल्‍या आहेत. (Maharashtra News)

बीडच्या (Beed) धारुर तालुक्यातील उमरेवाडी येथील सुर्यकांत लक्ष्मण खोत यांनी परतीच्या पावसाने सर्व पीक गेले. आता कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसरीकडे माजलगाव तालुक्यातील राजेगांव येथील रामेश्वर लक्ष्मण रकटे (वय 23) या तरुण शेतकऱ्याने परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यामुळे व शेत पिकांचे झालेले प्रचंड नुकसान पाहून गळफास घेऊन आत्महत्या केली.

रामेश्वर रकटे यांच्याकडे दीड एकर शेती असून त्या शेतीमध्ये सोयाबीन कापूस व कांदा लागवड केलेली आहे. परंतु परतीच्या पावसाने आपल्या शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहून वर्षभराची आपल्या कुटुंबाची गुजरान कशी होणार? या विवांचनेतून रामेश्वर रकटे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पाच दिवसांपासून आत्‍महत्‍या

दरम्यान आतापर्यंत गेल्या 5 दिवसांमध्ये 5 शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाने सर्वच हिरावून नेल्याने आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचं प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT