Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News : २ तालुक्यांतील शेतकऱ्यांचा आक्रोश; अचानक ट्रॅक्टर मोर्चा का काढला?

Amravati News : सततच्या अतिपावसाने संत्रा, मोसंबी पिकांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. या मुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले अनुदान अद्याप मिळालेले नाही. यासारख्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाला आहे. या मागण्या मान्य कराव्यात यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी काढला तहसील कार्यालयावर आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.    

सततच्या अतिपावसाने संत्रा, मोसंबी पिकांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. या मुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. (Amravati) अमरावती जिल्ह्यात ७० हजार हेक्टरवर संत्राची लागवड झाली असून अतिपावसामुळे एकूण लागवडीच्या आलेल्या बहराचे ८० टक्के पेक्षा जास्त संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्याना प्रति हेक्टर १ लाख रुपये मदत मिळावी; अशी (Farmer) शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. 

याशिवाय सोयाबीन, कापूस, तूर उत्पादक शेतकरी सुद्धा अति पावसाने हवालदिल असून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड तालुक्यात अतिवृष्टी जाहीर करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी. तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला लागलेल्या खर्चाच्या दुप्पट हमीभाव जाहीर करावा. मोर्शी वरुड तालुक्यात झालेल्या गारपिटीचे अनुदान जाहीर केले. मात्र ते अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही. या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मोर्शी उपविभागीय महसूल कार्यालयांवर शेतकऱ्यांचा आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुण्याजवळ असलेले हे ३ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT