Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : अमरावती जिल्ह्यासाठी पीकविमा मंजूर; तरीही ७९ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Amravati News : अमरावती जिल्ह्यात सन २०२२ - २३ च्या खरीप हंगामात ६९ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता. त्यानुसार वर्षभर पूर्वी १२३ कोटीचा परतावा मंजूर करण्यात आला

Rajesh Sonwane

अमर घटारे

अमरावती : पिकांचे नुकसान झाल्यानंतर त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने पीक विमा सुरु केला आहे. असे असताना गतवर्षीच्या नुकसानीनंतर (Amravati) अमरावती जिल्ह्यासाठी विम्याची रक्कम मंजूर झाली असून वर्षभरात कवडी देखील मिळाली नाही. जिल्ह्यातील तब्बल ७९ हजार शेतकरी (Farmer) पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. (Latest Marathi News)

अमरावती जिल्ह्यात सन २०२२ - २३ च्या खरीप हंगामात ६९ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा (Crop Insurance) काढला होता. त्यानुसार वर्षभर पूर्वी १२३ कोटीचा परतावा मंजूर करण्यात आला असताना सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. योजनेसाठी कप अँड कॅप मॉडेलचा जीआर शासनाने काढला प्रत्यक्षात अंमलबजावणी नसल्याने शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पिक विमा मिळाला नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खात्यात जमा होणार रक्कम 

शासनाने हा निधी कंपनीला देण्यास उशिरा १ मार्चला मान्यता दिल्याने बाधित शेतकऱ्यांना पिक विमा चा परतावा येत्या काही दिवसात मिळणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे वास्तव अजूनही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT