CCI Center Saam tv
ऍग्रो वन

CCI Center : सीसीआयच्या ग्रेडरकडून शेतकऱ्यांची फसवणूक; दोन किलो अतिरिक्त कापूस घेत असल्याचा आरोप

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात धागा येथे शासनाची सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू आहे. सीसीआय केंद्रावर शेतकरी कापूस घेऊन जात आहेत. यानंतर कापसाचे जेव्हा प्रतवारी तपासले जाते

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: विदर्भात प्रामुख्याने सर्वात जास्त पांढरे सोनं म्हणजे कापसाचे पीक घेतले जाते. मात्र आता याच अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची शासकीय खरेदी करणाऱ्या सीसीआयच्या ग्रेडरकडून फसवणूक करण्यात येत असून वजन करताना प्रति क्विंटल कापसामागे दोन किलो अतिरिक्त कापूस घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात धागा येथे शासनाची सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू आहे. मात्र या सीसीआय केंद्रावर शेतकरी कापूस घेऊन जात आहेत. या नंतर त्यांच्या कापसाचे जेव्हा प्रतवारी तपासले जाते. त्यावेळी शासनाच्या नियमाप्रमाणे ३४.२ लिंटचा कापूस खरेदी करावा, असे शासनाच्या गाईडलाईनमध्ये असताना त्या ठिकाणी सीसीआयचे नियुक्त ग्रेडर अधिकारी हे ३६ लिंट च्या कापसाच्या प्रतवारीची मागणी शेतकऱ्यांना करत आहे व ३६ लिंटचा कापूस त्या ठिकाणी नसेल तर तो कापूस सीसीआय केंद्रावरून परत पाठवत आहे. सोबतच प्रतिक्विंटल कापसाच्या वजनामागे दोन किलो अतिरिक्त कापूस घेऊन सीसीआय केंद्रावर एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

क्विंटलमागे दोन किलो कापूस अधिक घेतात 
शासनाची आधारभूत किंमत ही ७ हजार ४२१ रुपये एवढी असल्याने खाजगी बाजारात तो भाव कमी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आपला कापूस विकण्यासाठी सीसीआय केंद्रावर आणत आहे. मात्र त्या ठिकाणी शासनाच्या आधारभूत किमतीप्रमाणे सीसीआयने कापूस खरेदी करावा; असे अपेक्षित असताना सिसियाकडून कापसाची खरेदी करताना प्रतवारी सुद्धा दोन लिंट जास्त मागत आहे. प्रति क्विंटल कापसामागे दोन किलो कापूस सुद्धा जास्त घेत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून याकडे शासनाने लक्ष द्यावे; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

याबाबत शेतकऱ्यांनी सीसीआयच्या अधिकाऱ्यांना मेल करून तक्रार सुद्धा केली आहे..त्या बाबतचे पुरावे त्यांच्याकडे आहे. यासोबतच आपुलकी सामाजिक संस्थेने शासनाकडे या सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पाठपुरावा करून तात्काळ शासनाने लक्ष देण्याची मागणी केली आहे. ३४ लिंट म्हणजे दहा किलो कापसातून निघणाऱ्या सरकीची मात्रा ही ३ किलो ४२० ग्राम असावी, असा शासनाचा नियम असताना माल घेताना ३ किलो ६०० ग्राम पाहिजे; असं सीसीआयचे अधिकारी म्हणत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

Maharashtra Live News Update : नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

SCROLL FOR NEXT