Run Away Cases increasing after Lock Down 
आज पाहा

लाॅकडाऊन नंतर घरातून पळून येणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण वाढले

किरण खुटाळे

मुंबई : मुंबईत Mumbai कोरोनामुळे  मागील काही महिने लोकल सेवा बंद होती. माञ अत्यावश्यक सेवेसाठी लोकल Mumbai Local Train सुरू होताच, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्यानंतर घरातून पळून येणाऱ्या मुलांचं प्रमाणही वाढलेलं आहे. Run Away Cases increasing after Lock Down

मुंबईच्या मध्य Central आणि पश्चिम Western मार्गावर वर्षभरात तब्बल 600 अल्पवयीन मुले स्थानक परिसरात सापडली आहेत. यात 167 मुली आहेत. लाॅकडऊनमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात घरी थांबलेले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काही घरांंमध्ये गृहकलह वाढलेला आहे.

हे देखिल पहा

या सर्वांचा परिणाम हा घरातील अल्पवयीन मुलांवर होताना पहायला मिळत असून घर सोडून मुले-मली  मुंबईत आकर्षणापोटी पलायन करत असल्याचे समोर आले आहे. आकडेवारीनुसार  2016 ते 2021 या पाच वर्षात 1874 पलायन करून आलेले मुला-मुलींचा रेल्वेने ताबा त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केले आहेत. Run Away Cases increasing after Lock Down

पळून आलेल्या मुलांची आकडेवारी

मध्य रेल्वे
विभाग मुले मुली
मुंबई  93 49
पुणे  91 28
भुसावळ 26 15


 

पश्चिम रेल्वे
विभाग मुले मुली
मुंबई 47 40
रतलाम 50 18
बडोदा  34 17

 घरातून पळून जाण्याची प्रामुख्यानं कारणं

- पालकांकडून मुलांवर अभ्यास करण्यासाठी सक्ती

- आई-वडिलांनी सतत राग करणे किंवा मारणे

- रेल्वे आणि मुंबई विषयी असलेले आकर्षण

- घरात मोठ्यांमध्ये होणारे वाद, तसेच मोबाइल आणि टिव्ही पाहण़्यावरून वाद

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: लखनौचा दणदणीत विजय; चौधरीच्या फटकेबाजीत कोलकाता ढेर,KKRला रडवणारा मुकूल चौधरी आहे तरी कोण?

Jal Jeevan Mission scam: 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी IAS अधिकाऱ्याला अटक; ACB ची मोठी कारवाई

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

SCROLL FOR NEXT