Aurangabad News: एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल

एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल
Aurangabad News
Aurangabad NewsSaam tv

सिल्‍लोड : शेतकरी आत्‍महत्‍या अजूनही थांबलेल्‍या नाही. यातच सिल्‍लोड तालुक्‍यात एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी (Farmer) एकापाठोपाठ आत्‍महत्‍या केल्‍याचे उघडकीस आले आहे. त्‍यांच्‍या आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Maharashtra News)

Aurangabad News
Jalgaon News: शेतकऱ्याचे केळीची खोडे कापून फेकली; २५ लाखांचे नुकसान

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊ आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सिल्लोडच्या अंधारी गावात ही घटना उघडकीस आली आहे. भागिनाथ बाळूबा पांडव (वय ४६) व जनार्दन सुपडू तायडे (वय ५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी एकापाठोपाठ एक आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्‍ही शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com