नाशिक : मागील काही दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरवात झाली आहे. सकाळी थंडी जाणवत असून दुपारी मात्र तापमान ३० अंशाच्या वर जात आहे. तापमान वाढू लागल्याने आता कांदा पिकासह फळबागांना फटका बसू लागला आहे. यात प्रामुख्याने कांद्याचे नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे.
कांदा वाढीसाठी थंड हवामान आवश्यक आहे. मात्र जानेवारीपासूनच उन्हाची तीव्रता वाढल्यानं अनेक ठिकाणी कांदा पिकांची वाढ थांबली आहे. तर हवामानात होणारा बदल आणि उशिरा आलेली रोप आणि जानेवारीपासूनच वाढलेल्या तापमानाचा कांद्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यंदा कांदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अर्थात बदलत्या वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढवलं आहे.
फळबागांना वाढत्या तापमानाचा फटका
नंदुरबार जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमानात सातत्याने वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा हा ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून याचा फटका आता फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. वाढत्या उन्हामुळे पपई आणि केळी या फळबागांना मोठा फटका बसत आहे. वाढत्या तापमानामुळे केळी आणि पपई फळबाग खराब होण्याची भीती आता शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांचे नुकसान
शेतात मेहनत करून उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या मागे नैसर्गिक संकट कायम असते. अवकाळी पावसाचा फटका नेहमीच बसत असतो. यंदा फेब्रुवारीमध्ये वाढत्या तापमानाचा फटका पिकांना बसू लागला आहे. प्रामुख्याने केली, पपई व कांदा पिकाला याचा फटका बसत असून यात शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. तर खतांचा वापर करून देखील कांद्याची समाधानकारक वाढ होत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.