Nandurbar News : आठ तास वीजपुरवठा घोषित; नंदुरबार जिल्ह्यात मात्र खंडित वीजपुरवठा, शेतकरी अडचणीत

Nandurbar News : खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पूर्ण हातातून वाया गेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची अपेक्षा आहेत
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
 : राज्य सरकारने शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र (Nandurbar) आठ तास वीजपुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. (MSEDCL) शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे देखील अडचणीचे होत आहे. (Maharashtra News)

Nandurbar News
Swabhimani Shetkari Sanghatana Andolan : राजू शेट्टींनी साखर कारखाना काढून दाखवावा असे नेत्याने म्हणताच स्वाभिमानीचे आंदाेलक खवळले अन्...

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पूर्ण हातातून वाया गेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची अपेक्षा आहेत. परंतु शासन एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे; असं दर्शवत असते. परंतु महावितरण कंपनीकडून आठ तास वीजपुरवठा सुरळीतपणे होत नाही आहे. अधूनमधून ब्रेकडाऊन केला जात असतो. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar News
Ambajogai Crime: गर्दीचा फायदा घेत महिलेच्या बॅगेतील सव्वालाखाचे दागिने चोरले; अंबाजोगाई बसस्थानकातील घटना

रस्त्यावर उतरून आंदोलन 

भारत राष्ट्र समिती पक्षाकडून १२ तास वीज पुरवठा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी बारा तास सुरळीत वीजपुरवठा देण्यात यावी; अन्यथा शेतकऱ्यांसोबत भारत राष्ट्र समिती पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसत्याच्या इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com