सागर निकवाडे
नंदुरबार : यंदा शेतीमालाला सुरवातीपासूनच चांगला भाव मिळत नसल्याची स्थिती आहे. शेतीमालाच्या (Nandurbar) भावात अजूनही सुधारणा होत नसून कापूस, सोयाबीन व मिरचीला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. (Latest Marathi News)
नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस झाला आहे. शिवाय अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला होता. यात दोन हात करत शेतकऱ्यांनी पीक जगवले होते. परंतु (Cotton Price) कापूस, मिरची आणि सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येऊन ठेपलं आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणार नाही; अशी परिस्थिती आता शेतकऱ्यांसमोर उद्भवली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सध्या नंदुरबार बाजार समितीत सोयाबीन ४ हजार २०० ते ४ हजार ७२६ रुपये, कापूस ५ हजार ६०० ते ७ हजार १०० रुपये दरा तर मिरचीला २ हजार ५०० पासून ते ४ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. त्यामुळे शासनाने कापूस, मिरची आणि सोयाबीन काय झालं पिकांना योग्य भाव ठरवून द्यावे; अशी मागणी शेतकरी राजाकडून करण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.