संजय सूर्यवंशी
नांदेड : नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. नांदेडच्या किनवट तालुक्यातील मानसिंग नाईक तांडा, तोटंबा भागात अचानक भूगर्भातील पाणी पातळी घटल्याने विहिरी व बोअरवेल आतल्या आहेत. यामुळे शेतातील उभी पिके आता करपून गेली आहेत. चांगला पाऊस होऊन देखील फेब्रुवारी महिन्यातच पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
बदलत्या हवामानामुळे यंदा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता रब्बी हंगामातील पिके पोटच्या मुलांसारखी वाढविली असताना किनवट तालुक्यातील टोटंबा या भागातील पिके आता पाण्याअभावी करपून जात आहेत. दरवर्षी या भागात मे महिन्या पर्यंत पाणी पातळी कायम राहते. यंदा पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यातच भूगर्भातील पाणी पातळी घटल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट उभा टाकलं आहे.
मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस
राज्यात यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाला आहे. मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस होऊन नांदेड जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती. असे असले तरी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच नांदेड जिल्ह्यात पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. प्रामुख्याने शेतातील विहिरी व बोअरवेलचे पाणी झरे आटले आहेत. यामुळे आता पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आर्थिक मदतीची मागणी
फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदाच पाणी पातळी घटल्याचा नांदेडच्या किनवट तालुक्यातील प्रकार पाहण्यास मिळत आहे. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी यासारखी पिके पाण्याअभावी करपून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने या भागातील शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.