Crop Insurance : खरीप २०२२ चा ५० टक्के पिकविम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच

Dharashiv News : केवळ २३२ कोटी प्रशासनाकडे वर्ग केले आहेत. आज जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. दीड वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर देखील अद्याप विम्याची रक्कम निळालेली नाही
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : पिकांची नुकसान झाल्यास भरपाई म्हणून १ रुपयात विमा ही राज्य शासनाने योजना आणली आहे. परंतु (dharashiv News) पिकांचे नुकसान होऊन देखील अनेकांना भरपाई मिळत नाही. यात २०२२ च्या खरीप हंगामात उतरवलेल्या (Crop Insurance) पीक विम्यातील ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याची प्रतीक्षाच आहे.  (Breaking Marathi News)

Crop Insurance
Nanded News: भरधाव कार पुलावरून खाली कोसळली; भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, नांदेड जिल्ह्यातील घटना

धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२२ मधील ५० टक्के पिकविमा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला असुन उर्वरित ५० टक्के निधी अद्यापही दिलेला नाही. यामध्ये विमा कंपनीने २८२ कोटी देण्याचे जाहीर केले होते. मात्र यातील केवळ २३२ कोटी प्रशासनाकडे वर्ग केले आहेत. आज जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना (Farmer) विमा मिळाला नाही. दीड वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर देखील अद्याप विम्याची रक्कम निळालेली नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Crop Insurance
Jalgaon Accident : मधमाश्यांच्या हल्ल्याने नियंत्रण सुटून ट्रॅक्टर नदीत कोसळले; चालकाचा जागीच मृत्यू

विमा कंपनीचे (Crop Insurance Company) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सरसकट विमा देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. सरकारची विमा कंपनी असुन या कंपनीने आमच्या शेतकऱ्यांचा सरसकट विमा द्यावा, अन्यथा विमा कंपनीच्या मुंबईतील कार्यालयासमोर पुढील आंदोलन करणारा असा इशारा (NCP) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com