Ahmednagar News: कृषीपंपाचा वीज बंद केल्‍याने शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

कृषीपंपाचा वीज बंद केल्‍याने शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv

अहमदनगर : अहमदनगरच्या अकोळनेर येथील 55 वर्षीय शेतकऱ्याने (Farmer) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (Ahmednagar) समोर आली आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा बंद असल्‍याने टोकाचे पाऊल उचलल्‍याचे सांगितले जात आहे. (Live Marathi News)

Ahmednagar News
Crime News: धक्‍कादायक..गळ्यावर वार करून चिमुरडीची हत्‍या; चुलत बहिणीवर संशय

पोपट जाधव असे आत्‍महत्‍या केलेल्‍या शेतकरीचे नाव आहे. पोपट जाधव यांच्या शेतीपंपाची वीज बंद केल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. यामुळे दोषींवर कारवाई होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. पोलिसांनी (Police) सुमोटो गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केली.

सर्व दोषींवर कारवाईची मागणी

एकीकडे सरकार सांगतेय की शेतकऱ्यांची वीज बंद केली जाणार नाही आणि दुसरीकडे महावितरण हे रोहित्र बंद करत आहेत. असे म्हणत जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्वच दोषींवर कारवाईची मागणी कार्ले यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com