सचिन बनसोडे
राहुरी (अहिल्यानगर) : राज्य शासनाचा मुख्यमंत्री सौर कृषी विज वाहिनी ही महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. ग्रामपंचायत हद्दीत सोलर पॅनल उभारण्यात आले आहे. यातून निर्माण होणाऱ्या सौर ऊर्जेचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकणार आहे.
मागील काही महिन्यांमध्ये सोलर पॅनल उभारण्यावर भर दिला जात आहे. यात घरगुती सोलर पॅनल तसेच राज्य शासनाचा मुख्यमंत्री सौर कृषी विज वाहिनी ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. याचा फायदा आता होत असल्याचे दिसून येत आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील वांबोरी ग्रामपंचायतने दिलेल्या साडेआठ एकर जागेवर सोलर पॅनल उभारले गेले आणि त्यातून तयार होणारी विज ७५० शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे.
३८०० शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज
उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या इतर गावांनीही प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिली असून लवकरच या उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या ३८०० शेतकऱ्यांना दिवसा विज उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. अर्थात शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी पिकांना शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागत होते. सोलर योजनेमुळे रात्री शेतीला पाणी भरण्याचा त्रास कमी होणार आहे.
आतापर्यंत रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागत होते. यामुळे हिंस्त्र प्राणांचा धोका असायचा. दरम्यान सोलर योजनेमुळे हा त्रास कमी झाला असून जंगली श्वापदांपासून संरक्षण होत असल्याने शेतकऱ्यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत. लाडक्या बहिणींप्रमाणे आता शेतकरीही लाडके झाल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.