आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाहिलं तर मुंबई इंडियन्स परिस्थिती फारच बिकट आहे. अशावेळी चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की टीम प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? परिस्थिती कठीण असली तरी शक्यता पूर्णपणे मावळलेल्या नाहीत.
मुंबईने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यात फक्त 2 विजय मिळवले आहेत. तर 5 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात 4 पॉईंट्स असून ते नवव्या स्थानावर आहेत.
जर मुंबईला प्लेऑफ गाठायचं असेल तर समीकरण अगदी स्पष्ट आहे. मुंबईला उरलेल्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. त्यांना उरलेल्या 7 पैकी किमान 5 किंवा 6 सामने जिंकणं गरजेचं आहे.
जर मुंबईने उरलेले सर्व 7 सामने जिंकले तर त्यांचे 18 गुण होतील. अशा परिस्थितीत त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित होईल. हा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जातो.
जर टीमने फक्त 5 सामने जिंकून 14 गुण मिळवले, तर प्लेऑफची स्पर्धा खूपच कठीण होणार आहे. अशा वेळी नेट रन रेट खूप महत्त्वाचं ठरतं. फक्त विजय नव्हे, तर मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं आहे.
मुंबईला स्वतःची कामगिरी सुधारण्याबरोबरच इतर टीमच्या निकालांवरही लक्ष ठेवावं लागेल. प्लेऑफ गाठण्यासाठी इतर टीम्सचं नेट रन रेट वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे
यंदाच्या सिझनमध्ये पंजाब किंग्ज प्लेऑफ गाठण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे. त्यांनी ८ सामने खेळले असून त्यापैकी केवळ एका सामन्यात पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झालाय. त्यांच्या खात्यात १३ पॉईंट्स आहेत.