श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील चौखांबी दरवाज्यावर आता चांदीचा झळाळता शृंगार पाहायला मिळतोय. कारण, अहिल्यानगर येथील दोन विठ्ठलभक्त व्यापाऱ्यांनी तब्बल १ कोटी १० लाख रुपये किमतीचा ८७ किलो वजनाचा चांदीचा दरवाजा श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला आहे. अतुल पारख आणि गणेश आव्हाड या भक्तांनी आपल्या सेवाभावातून हा अनुपम भेटवस्तू देवस्थानाला अर्पण केली आहे. हा दरवाजा विशेष कलाकुसरयुक्त असून, तो राजस्थानातील उदयपूर येथे बनवण्यात आला आहे.
या चांदीच्या दरवाजाची निर्मिती सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत करण्यात आली.दरवाज्यावर झालेली नक्षीकाम, कोरीव काम आणि सूक्ष्म तपशील पाहता, हे विठ्ठलभक्तांचे योगदान मंदिराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरलं आहे.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात लाखो भाविकांची उपस्थिती असताना, विठ्ठल मंदिरात झालेला हा चांदीचा शृंगार भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.