UPI Rule Change : UPI च्या नियमांमध्ये मोठा बदल! सर्वसामान्यांना फायदा; पेमेंट फेल झालं तर लगेच परतावा

UPI Rule Change: यूपीआयच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. यूपीआय पेमेंट जर अयशस्वी झाले आणि तुमच्या अकाउंटमधून पैसे गेले तर तुम्हाला आता लगेचच परतावा मिळणार आहे.

सध्या सर्वकाही डिजिटल झालं आहे. अगदी भाजी घेण्यापासून पासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी आपण यूपीआय पेमेंट करतो. दरम्यान, यूपीआय पेमेंटच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. हा बदल ग्राहकांच्या हितासाठीचा आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

जर एखाद्या युजरचे यूपीआय पेमेंट अयशस्वी झाले. त्याचे ट्रान्झॅक्शन झाले नाही तर त्याचा परतावा येण्याची प्रक्रिया जलद होणार आहे. NPCI चा चार्जबॅक प्रोसेस स्वयंचलित म्हणेज ऑटोमॅटिक करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी जर ट्रान्झॅक्शन फेल झाले तर चार्जबॅकची प्रोसेस मॅन्युअली म्हणजे स्वतः करावी लागत होती. मात्र, आता ही प्रोसेस ऑटोमॅटिक होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com