उल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ उडाली असून १८ ते २० लाख रुपयांची रोकड एका रिक्षामधून आढळून आली आहे. ही रिक्षा सुभाष टेकडी चौक परिसरात पकडण्यात आली. ही रोकड अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी स्वतः पाठलाग करून पकडल्याचा दावा केला आहे. गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित रिक्षाचा पाठलाग केला आणि अखेर सुभाष टेकडी चौकात रिक्षा अडवण्यात आली.
रिक्षाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. यानंतर रिक्षा चालकासह संपूर्ण रोकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, नरेश गायकवाड यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, ही रोकड महानगरपालिका समोर असलेल्या भाजप प्रवक्ते प्रदीप रामचंदानी यांच्या कार्यालयातून निघाल्याचा संशय आहे. मात्र, या आरोपांवर अद्याप भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
या घटनेमुळे उल्हासनगरमधील राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक आयोग आणि पोलिस काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.