विधिमंडळाच्या आवारात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे चर्चा करत असताना, हरामखोर आहेत ते असं उद्धव ठाकरे म्हटले. आज विधानसभेत दिशा सलियान प्रकरणावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. अनेकांनी आदित्य ठाकरे यांचे जाहीर नाव घेत अनेक आरोप केले. यावरच उद्धव ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे दोघे विधानभवनात जात असताना त्या दोघांमध्ये चर्चा सुरू होती आणि उद्धव ठाकरे यांनी विचारले कोणी हा मुद्दा उपस्थित केला तर त्यावर सरदेसाई म्हणाले, राम कदम यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले हरामखोर आहे ते अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मागील काही दिवसापासून दिशा सालियान प्रकरण गाजत आहे, यावर ठाकरे पिता पुत्रांवर सत्ताधारी पक्षांकडून आरोप केले जात आहे. यावरच उद्धव ठाकरे हे संतापलेले पाहायला मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.