भाजपने जिन्नांना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली, मग भाजपने हिंदुत्व सोडले का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत विचारला, उद्धव ठाकरे म्हणाले, आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचे सांगत ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले.
काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्तीसाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 इतके मतदान झाले. यावरच शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल चढवलाय.
ज्या किरेन रिजिजू यांनी हे बिल मांडले त्यांनी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. आता तेच बिल मांडत असतील तर हा योगायोग आहे. लोकांना झुजवायच आणि राजकीय पोळी यांना भाजायची आहे. सुधारणा विधेयकामध्ये काही मुद्दे चांगले आहेत. वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही ताब्यात घेणार अस म्हणताय, म्हणजे त्यांच्या जमिनीवर यांचा डोळा आहे. जिन्नांना लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू घेणारी भाषण अमित शाह आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी केली. अशी टीका वक्फ विधेयकाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.