केदारनाथ दुर्घटनेत वणीतील जयस्वाल दाम्पत्य आणि मुलीचा मृत्यू; अंत्यसंस्कारावेळी मुलांनी टाहो फोडला|VIDEO

Rajkumar Jaiswal family killed in Kedarnath : केदारनाथ दुर्घटनेत वणीतील जयस्वाल कुटुंबियाचा मृत्यू झाला. डीएनए चाचणीनंतर पार्थिव वणी येथे आणून आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

केदारनाथ येथे रविवारी दि १५ जून रोजी सकाळी ५.२० वाजता झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणीतील नांदेपेरा मार्गावरील व्यावसायिक राजकुमार जयस्वाल, त्यांच्या पत्नी श्रद्धा जयस्वाल, आणि दोन वर्षांची मुलगी काशी जयस्वाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या दुर्घटनेनंतर मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी दिल्ली येथे डीएनए चाचणी करण्यात आली.

चाचणी पूर्ण झाल्यानंतर तिघांचेही पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर दिल्लीहून विशेष विमानाने पार्थिव नागपूर येथे आणण्यात आले आणि तेथून पुढे वणीमध्ये आणण्यात आले. आज सकाळी ९ वाजता वणीतील मोक्षधाम येथे या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले . या दुर्दैवी घटनेमुळे वणी परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक व्यापारी, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com