त्रिभाषा धोरणाविरोधात एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंविषयी राज्यभरात उत्सुकता आणि सकारात्मकता आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हीने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येत आहेत, यापेक्षा मोठं काहीच नाही, अशा शब्दांत तीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल दोन दशकांनंतर एका व्यासपीठावर येत असल्याची ऐतिहासिक घटना आज मुंबईतल्या वरळी डोममध्ये पाहायला मिळणार आहे.येथे सर्वजण जो जीआर रद्द झालेला आहे त्याचा विजय साजरा करण्यासाठी आलेलो आहोत तेजस्विनी पंडित हीची ही प्रतिक्रिया ऐकून अनेकांनी तिच्याशी सहमती दर्शवली आहे.या एकतेमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.