राज्यात 10 हजार शिक्षकांची भरती होणार आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षण विभागाने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र निवडलंय.आता सरल पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तिसऱ्या भाषेचे पसंतीक्रम घेतला जाणार आहे.त्यानंतर गरजेनुसार शिक्षकांची कंत्राटी तत्वावर भरती केली जाणार असल्याची माहिती आहे दरम्यान विद्यार्थ्यांची तिसऱ्या भाषेची पसंती घेऊन पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी ऑगस्ट उजाडेल असं सांगितलं जातंय. आता विद्यार्थ्यांना तिसरी भाषा कोणती निवडायची हे ठरवता येणार आहे. विद्यार्थ्यांनी ठरवल्यानंतर त्यानुसार किती शिक्षकांची कोणत्या विषयासाठी आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन ही भरती केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.