सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महायुती सरकारला चांगलेच फटकारले आहे. महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूने ने निकाल देत उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधत या निकालाची सखोल माहिती दिली. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि उच्च न्यायालयाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय कायम ठेवला. पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होईल का नाही हे पाहावे लागेल. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला ते पुढे म्हणाले, या प्रकरणात दुर्दैवाची बाब म्हणजे स्वतः राज्य सरकारचा आरोपी आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीत सरकारच्या ताब्यात असताना झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.