नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा जनआक्रोश मोर्चा पार पडला.
खासदार संजय राऊत यांनी राहुल धोत्रे हत्या प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल केला.
आरोपी उद्धव निमसे फरार असून, तो गिरीश महाजनांना भेटल्याचा आरोप.
राऊत यांनी राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दांत टीका केली.
नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं एकत्रित येत जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित होते. हजारो सख्येनं लोकांनी या मोर्चात सहभाग घेतला. या मोर्चात संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.
राऊत म्हणाले, 'राहूल धोत्रेची निर्घृण हत्या देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी केली. उद्धव निमसे अजूनही फरार आहे. एक नगरसेवक हत्या करून फरार होतो. फरार असतानाही गिरीश महाजनांना भेटतो. मग त्याला कोण वाचवत आहे? ही गोष्ट जर राज्याचे गृहमंत्री आणि नाशितचे पालकमंत्री यांना माहित नसेल तर, अशा लोकांना राज्य करण्याचा अधिकार नाही', असं राऊत म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.