शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज धाराशिव शहरात जंगी स्वागत करण्यात आले. गेल्या ५६ वर्षांपासून ही पवित्र परंपरा अखंडितपणे सुरू असून, यंदाही पालखीने भक्तीमय वातावरणात शहरात आगमन केले.
गेल्या तीन दिवसांपासून संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात जात आहे. आज ती धाराशिव शहरात दाखल झाली आणि शहरातील लेडीज क्लब मैदानावर तिचा मुक्काम आहे. शहरात पालखीच्या आगमनानंतर भाविकांनी फुलांची उधळण, भजन-कीर्तन, ढोल-ताशा पथकांसह उत्स्फूर्त स्वागत केले. पालखी सोहळ्यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी "गण गण गणात बोते" चा जयघोष केला. वातावरण भक्तिरसात न्हालं होतं. अनेक ठिकाणी पाणपोया, फलाहार व विश्रांती केंद्रं उभारण्यात आली होती.
ही पालखी यात्रा शेगावहून सुरू होऊन विविध गावांतून मार्गक्रमण करत पंढरपूरच्या दिशेने जाते. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत असून, श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्य याचं प्रतीक असलेल्या या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.