शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. आपले पंतप्रधान आणि त्यांचे समर्थक स्वतःला देवाचे अवतार समजतात असा घणाघात करत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.ते म्हणाले या देशात 24 तासामध्ये उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेतला जातो कारण ते सरकारचे ऐकत नाही. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 लोकांचा मृत्यू होतो. मात्र सरकार माफीही मागत नाही आणि कोणाकडून राजीनामा देखील घेत नाही. आपले पंतप्रधान म्हणता कोणतीही घटना घडण्यापूर्वीच मला कुणकुण लागते, ही ईश्वराची कृपा माझ्यावर आहे असं मोदी म्हणतात. मग पहलगाममध्ये हल्ला होणार होता तर मग ते तुम्हाला कसे कळले नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.