नागपुरात समृद्धी महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.समृद्धी महामार्गावर हजारो गाड्या अडकून पडल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूं यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केलं होते. या आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना बसलेला आहे कर्जमाफीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.गेले तीन दिवस ते नागपुरात आहेत.लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा अशी त्यांची भूमिका आहे. या अंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांनी नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. तसेच माहामार्ग रोखल्याने वाहन चालकांना मोठा फटका बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.