Bachchu Kadu: कोर्टाच्या आदेशानंतरही बच्चू कडू आंदोलनावर ठाम, म्हणाले - 'लोक उठ म्हणतील तेव्हाच उठू'| VIDEO

Nagpur Farmers Protest: शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. नागपूरमध्ये रास्तारोको आणि रेलरोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी कोर्टाने दिलेली वेळ संपलेली असताना देखील बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत.

नागपुरात शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करत असलेले नेते बच्चू कडू यांना नागपूर खंडपीठाने संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी एक रोखठोक भूमिका घेतली असून, 'न्यायालय महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा लोकन्यायालय त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे,' असे म्हटले आहे. कोर्टाच्या आदेशापेक्षा लोकांचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे सांगत, जोपर्यंत लोक सांगत नाहीत तोपर्यंत आंदोलनाच्या जागेवरून हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता न्यायालयीन आदेश आणि बच्चू कडू यांची भूमिका यांमुळे संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे नागपूरमधील वाहतूक विस्कळीत झाली असून, सरकार आणि आंदोलकांमध्ये तणाव वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com