पुणे येथील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिला आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. हगवणे कुटुंबाबाबत आलेल्या तक्रारीवर महिला आयोगाने कारवाई केली असती तर आज वैष्णवी जिवंत असते त्यामुळे वैष्णवीच्या मृत्यूला महिला आयोग जबाबदार आहे असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. याबाबत खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे त्यात त्यांनी म्हटले की वैष्णवीच्या प्रकरणात महिला आयोगाच्या अक्षम चुका दिसत आहे.
महिला आयोगाकडे जवळपास 32000 केसेस पेंडिंग आहेत. त्यामुळे आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कमी पडत आहे. आयोग महिलांना लवकर न्याय देत नाही कारण महिला आयोगाचे अध्यक्षही पार्ट टाइम आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष या अजित पवार यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे पार्ट टाइम महिला आयोगाच्या अध्यक्ष बदलून पूर्णवेळ अध्यक्ष महिला आयोगाला द्याव्या अशी मागणी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.