Ravikant Tupkar: सत्तेच्या मस्तीत सरकार, त्यांना शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नाही! रविकांत तुपकरांची टीका

Maharashtra Farmers Suicide News: रविकात तुपकर यांची सरकारवर टीका, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नसल्याचा तुपकरांचा सरकारवर आरोप

बुलढाणा : सत्तेच्या मस्तीत हे सरकार काम करीत आहे, त्यांना शेतकऱ्याचे काहीही घेणे देणे नाही, अशी संतप्त टीका रविकांत तुपकर यांनी केलीय. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की आता राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही.. त्यांचा पायगुण उलटा लागला की ते गुवहा टी ला जाऊन मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या,सोयाबीन कापसाला भाव नाही, तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन कापूस पडून आहे, खरीप तोंडावर येऊन ठेपलाय, असं म्हणत तुपकरांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. विदर्भात अजूनही शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत, यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात १ जानेवारी ते २५ मे २०२४ या पाच महिन्याच्या काळात ७९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक शासकीय आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक २४ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com