Maharashtra Politics: उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे भिकेचा कटोरा घेऊन गेले, रामदास कदमांची जहरी टीका |VIDEO

Uddhav Thackeray seeking alliance with Raj Thackeray: रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करताना म्हटलं की, उद्धव हे राज ठाकरेंच्या युतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन गेले आहेत. तसेच मराठी माणसाला मुंबईबाहेर फेकण्याचं खापरही त्यांनी उद्धव यांच्या डोक्यावर फोडलं.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा आज दूसरा भाग प्रदर्शित झाला. उद्धव ठाकरेच्या या मुलाखतीवरुन शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरेंच्या युतीसाठी उद्धव ठाकरे हे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत. राज ठाकरे काहीही बोलत नाही. मुंबईत 12 टक्के मराठी माणूस शिल्लक आहे. महापालिका कशी गळ्यात घालता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत, असा निशाणा रामदास कदम यांनी साधला. मुंबईतील मराठी माणूस हा नालासोपारा,विरार इथे फेकला गेला आहे याला जबाबदार उद्धव ठाकरे हे आहे आहे असे कदम म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com