राज्यात अनेक तरुण पोलिस भरतीच्या प्रतिक्षेत आहे.पोलिस भरतीचे आश्वासन सरकारने दिले आहे. मात्र, अद्याप पोलिस भरतीबाबत कोणतीही प्रक्रिया सुरु झाली आहे. डिसेंबर २०२४ च्या आकडेवारीनुसार, राज्यात तब्बल ३३ हजार पदे रिक्त आहेत. मात्र, अद्याप भरती सुरु झालेली नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ९ हजार पदे भरती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुका होऊन गेल्या तरीही अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे भरती होणार कधी अशी संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
राज्यात हजारो उमेदवार पोलिस भरतीची तयारी करत आहेत. मात्र, अद्याप पोलिस भरतीबाबत कोणतीही प्रक्रिया सुरु न झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.