दहशतवादाच्या माध्यमातून भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कडक इशारा दिला आहे. जर पाकिस्तानने भारताच्या विरोधात दहशतवादाला प्रोत्साहन देणे सुरूच ठेवले, तर त्यांना स्वतःलाच ठरवावे लागेल की त्यांन जगाच्या भूभागाचा भाग बनून राहायचे आहे की इतिहासात जमा व्हायचे आहे. 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित 'आर्मी डायलॉग' कार्यक्रमादरम्यान लष्करप्रमुखांनी हे वक्तव्य केले. दिल्लीतील मानेकशॉ सेंटरमध्ये 'ऑपरेशन सिंदूर'सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास भारताची भूमिका काय असेल, असे विचारले असता, जनरल द्विवेदी यांनी भारत आपल्या सुरक्षे आणि सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट उत्तर दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.