जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे विसा रद्द करत भारतात असलेल्या पाकिस्तानींना हुसकावून लावले आहे. त्यांनंतर पाकिस्तान हा बिथरला असून पोकळ धमकी देत आहे.
पाकिस्ताननं पुन्हा एकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. भारताने पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली किंवा सिंधू नदीचं पाणी थांबवलं, तर त्याला अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर दिलं जाईल, अशी पांचट धमकी पाकिस्तानचे रशियातील राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी दिली आहे.
रशियामधील एका मुलाखतीत बोलताना जमाली यांनी म्हटलं की, भारताच्या लष्करी कारवाया आणि योजनांबाबत आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. जर भारताने सिंधू नदीचं पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला आमच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी अण्वस्त्रांचा वापर करावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.