जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी आहे. यामध्ये काही पर्यटक महाराष्ट्रातले असून पुणे येथील कर्वे नगरचे गनबोटे जगदाळे कुटुंब हे आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी साम टीव्हीशी संवाद साधत पर्यटकांना सुरक्षित आणले जाईल असे आश्वासन दिले.
ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत त्यांनी गृहमंत्री अमित शाह हे जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले असल्याची माहिती दिली. पहिला प्रयत्न आपला आहे की तेथे गेलेल्या पर्यटकांची ओळख पटणं. आणि त्यांच्यावर तिथे उपचार करून त्यांना सुखरूप आपल्याकडे आणणे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्कात असून पर्यटकांना सुरक्षित आणले जाईल, आणि माझ्या मतदारसंघातील दोन परिवार हे तिथे आहेत, त्या परिवाराच्या घरी तातडीने भाजपचे कार्यकर्ते पाठवले आहेत आवश्यक ती मदत त्यांच्या परिवाराला केली जाईल. या भ्याड हल्ल्याचा नरेंद्र मोदी हे बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.