राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतून महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी फडणवीस यांनी सरकारच्या विकासासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. सांगली-मिरज-कुपवड या शहराच्या विविध भागांत जे परिवर्तन बघायला मिळतं. एक आधुनिक शहर कसं तयार करायचं हा एक प्रश्न आहे. मागच्या काळात रस्ते, गटार यांच्यासाठी पैसे दिले. वेगवेगळ्या योजनांसाठी पैसे दिले. विविध भागांत एक बदल बघायला मिळतो. शहराला शहराचं स्वरुप प्राप्त झालंय. दोन्ही आमदार म्हणत होते, तुम्ही पैसे देऊ म्हणून सांगितले होते ते दिले. आताही घोषणा करा. पण मी एकच घोषणा करणार आहे. तुम्ही महापालिका निवडून आणा, तुम्हाला कुठल्याच कामसाठी पैशाची कमतरता पडू देणार नाही, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं.
'सांगली सर्वात चांगली आहे' असे म्हणत त्यांनी शहराला महापुराच्या संकटातून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी ४ हजार कोटी रुपयांच्या 'फ्लड डायवर्शन' प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पाचा पहिला टप्पा ५९१ कोटी रुपयांचा असून त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सांगलीच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन ४५४ कोटी रुपयांची वारणा नळ पाणीपुरवठा योजना, कोल्हापूर (कौलापूर) येथे विमानतळ निर्मिती आणि आयटी इंडस्ट्री आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. शहरांचे आधुनिकीकरण हेच आमचे व्हिजन असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.