Navi Mumbai Airport नामकरणावरून वाद न्यायालयात, केंद्र सरकारकडून निर्णयाला विलंब

Airport Naming Dispute: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून वाद निर्माण झाला असून प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून अंतिम निर्णयाला विलंब झाला आहे. उद्घाटनाआधीच हा वाद चर्चेत आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार असून, प्रवाशांसाठी नवी सुविधा सुरू होणार आहे. नोव्हेंबरपासून पहिले उड्डाण सुरू करण्यासाठी अदानी उद्योगसमूह आणि सिडकोकडून तयारीही सुरू झाली आहे. विमानतळाच्या बांधकामाचे तब्बल ९६ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे.

मात्र या विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन सत्ताधारी पक्षाकडून वारंवार देण्यात आले, परंतु अद्याप त्याबाबत ठोस कार्यवाही झालेली नाही. या विलंबाविरोधात केंद्र सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. परिणामी हा प्रश्न आता न्यायालयात गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल झाली असून, या प्रकरणाचा निकाल कोणत्या पद्धतीने आणि किती लवकर लागतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, नवी मुंबई, पनवेल, उरण आणि ठाणे परिसरातील प्रकल्पग्रस्तांमध्ये यामुळे नाराजी पसरली आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर या प्रकल्पाचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली होती. मात्र नामकरणाच्या वादामुळे आता त्यांचा असंतोष उफाळून आला आहे. विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे असताना हा प्रश्न कायम असल्याने उद्घाटनापूर्वीच राजकीय आणि सामाजिक चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com