मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून 15-15 मिनिटांचे ब्लॉक घेण्यात येत आहेत. या अंतर्गत पुण्याकडून मुंबईकडे जाणारी सर्व वाहने खंडाळा टनलजवळ थांबवली जात असून, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने दत्तवाडी–खंडाळा येथून विरुद्ध दिशेने सोडली जात आहेत.
या उपाययोजनेमुळे काही प्रमाणात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळत असला, तरी मुंबईकडे जाणारी वाहने खंडाळा टनलजवळ थांबवल्याने एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात विलंबाचा सामना करावा लागत आहे.
महामार्गावरील खंडाळा टनल, बोरघाट चौकी, दत्तवाडी, अंडा पॉईंट आणि खोपोली एक्झिट या ठिकाणी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलीस सतत कार्यरत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, वाहनचालकांनी संयम राखावा आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.