Maratha Reservation: मुंबई पोलिसांचा अल्टिमेटम; ३ वाजेपर्यंत शहर रिकामं करा; मराठा आंदोलकांचा आक्रोश | VIDEO

Mumbai Police On High Alert: मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांना तीन वाजेपर्यंत शहर सोडण्याचा आदेश दिला. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागच्या चार दिवसांपासून मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. मात्र मुंबई पोलिसांनी 3 वाजे पर्यंत मुंबई सोडण्याच्या सूचना केल्यानंतर जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत इथून हालणार नाही असा पवित्रा घेतलाय. आजच्या सुनावणीत जेष्ठ विधीज्ञ सतीश मानेशिंदे यांनी मनोज जरांगे यांची बाजू मांडली. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांच्या कृतीबद्दल माफी मागितली. मराठा आंदोलकांची व्यवस्था न झाल्यामुळे ही परिस्थिति निर्माण झाली असे त्यांनी म्हटले. मात्र तरी देखील न्यायालयाने मराठा आंदोलकांना दिलासा दिलेला नाहीये. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. ते घराबाहेर पडू शकत नाहीत. तीन वाजेपर्यंत आम्हाला सगळे सुरळीत हवंय. अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीच्या आढावा घेऊ असे मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले. आता तीन वाजता उर्वरित सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com