मुंबई हायकोर्टाने गणेशोत्सवात पीओपी पासून बनवलेल्या मोठ्या गणेशमूर्तींचंही कृत्रिम तलावातच विसर्जन व्हावं, असं स्पष्ट मत नोंदवलं आहे. ८ फूटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक करावं, यावर गंभीरपणे विचार करण्याच्या सूचना न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिकेला दिल्या आहेत.
सध्या ५ फूटांपर्यंतच्या मूर्तींसाठीच कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक आहे. मात्र, ५ फूटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींची संख्या ७ हजारांहून अधिक असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या कृत्रिम तलावांमध्ये या सर्व मोठ्या मूर्तींचं विसर्जन करणे शक्य नसल्याचंही सरकारने कोर्टात सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.