मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुरु असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, शाळकरी मुले आणि रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दहिसरच्या शारदाश्रम शाळेच्या 12 बसेस वज्रेश्वरीहून पिकनिकवरून परतताना या कोंडीत अडकल्या होत्या.यात तब्बल 500 हून अधिक विद्यार्थी तासन् तास बसमध्ये अडकून राहिले होते. या प्रकरामुळे स्थानिक नागरिकांनी संतप्त होत “आम्हाला इकडे जगावं की नाही?” असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान या घटनेविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कळवण्यात आले असता त्यांच्या फोननंतर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. तर नागरिकांनी वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.