धाराशिव: मनोज जरांगे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, जरांगे यांनी 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला, त्यासाठी जरांगे यांच्याकडून तगड नियोजन सुरू आहे. मुंबई येथील आंदोलनासाठी 1 हजार स्वयंसेवक, 1हजार डॉक्टर, तज्ञ वकील, आणि 5 हजार पाणी टँकर, अशा प्रकारचे नियोजन देखील यावेळी करण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे.
ते पुढे म्हणाले, जो नेता २९ ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पाडा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते सध्या गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत राजकीय नेत्यांना हा इशारा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.